Posts

माझे बाबा - माझी प्रेरणा " संस्कारांचा ठेवा .

  पुस्तक परिक्षण :- " माझे बाबा - माझी प्रेरणा "  संस्कारांचा ठेवा .         प्रा. डी एस लहाने हे समाजातील एक लक्षवेधी नाव असून घटस्फोटिता, परित्यक्ता ,विधवा अशा महिलांच्या पुनर्विवाहांवर चिंतन करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. यांनी समाजातील एकल महिलांसाठी पुनर्विवाह चळवळ हाती घेतली आणि या चळवळीला बरेच यश आले. त्यांनी आजपर्यंत अनेक एकल महिलांचे पुनर्विवाह लावून दिली आहेत.सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे प्रा. डी एस लहाने यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आहे.          प्रा. डी एस लहाने हे शिवसाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांना शैक्षणिक आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. त्यांचे सहकार क्षेत्रात सुद्धा चांगले योगदान असून त्यांनी शिवसाई सहकारी पतसंस्थेचे शहरी व ग्रामीण भागात जाळे विणले आहे. एकल महिला म्हणून जीवन जगणे आणि समाजाच्या पारंपारिक धारणांना झुगारून देणे हे विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटिता महिलांना सोपे नाही. ती एक तारेवरची कसरत असते. परंतु प्रा डी एस लहाने...

साहित्यिक प्रा. बी. ए. खरात -

      साहित्यिक प्रा. बी. ए. खरात -- स्वयंविकसित व्यक्तिमत्त्व  ----------------------------------------------------------------------------          बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ य गावी प्रा बी ए खरात यांचा २८ जानेवारी १९४८ रोजी एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. बळीराम आश्रुजी खरात आणि रामकोरबाई हे त्यांचे निरक्षर आईवडील. त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती अत्यंत हलकीची होती. निमगाव वायाळ हे गाव हिवरखेडा (पूर्णा) जवळ असून तेथे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या. हिवरखेड (पूर्णा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रा. बी ए खरात यांचे शिक्षण झाले. ते इयत्ता चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत हिवरखेड केंद्रामधून १९५९ मध्ये सर्वप्रथम आले. आईवडिलांना खूप आनंद झाला.          प्रा. बी ए खरात यांच्या वडिलांना केंद्रावर निकालाच्या दिवशी बोलविण्यात आले. केंद्रप्रमुखांनी सांगितले की तुमचा बळीराम पोरगा फार हुशार निघाला. हिवरखेडा केंद्रातून तो सर्वप्रथम आला, असे मुख्याध्यापकांनी सांगताच त्यांच्...
  श्री गजाननराव राऊत : एक सामाजिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व  --------------------------------------------------------------------------------       बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील वडोदा (पान्हेरा) येथे जन्मलेले गजानन शालिग्राम राऊत आजरोजी श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहतात . ते एक स्वयंविकसित अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांचा जन्म २० एप्रिल १९७० रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. परिस्थितीवर मात करून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांचे वडील शालिग्राम निनाजी राऊत हे केवळ चौथा वर्ग पास होते तर आई निर्मलाबाई या अडाणी होत्या. हे कुटुंब जरी कमी शिकलेले असले तरी सुसंस्कारित, नितीमान आणि कष्टाळू होते म्हणून स्वर्गीय राऊत साहेबांनी त्यांच्या वडिलांना शिपाई म्हणून बुलडाणा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये लावून घेतले.       गजानन राऊत यांचे प्राथमिक शिक्षण नगरपरिषद विद्यालय बुलढाणा येथे तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल बुलढाणा येथे झाले. त्यांच्यामध्ये जन्मजा...

महाराणी गुणवंताबाई ...

महाराणी गुणवंताबाई आणि दिपिकाबाई स्मृती प्रित्यर्थ :  करवंड महोत्सव --------------------------------------------------------------------------       शिवकालीन साम्राज्यात करवंड हे गाव अहमदनगर ते विजापूर या महामार्गावर केंद्रस्थानी होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा मोहिमेवर निघायचे, तेव्हा ते करवंड येथील इंगळे घराण्याला आवर्जून माहिती द्यायचे, हे विशेष होते. काही काळ ते करवंडला विश्रांती देखील घ्यायचे.  त्या काळात या भागात काही गावांमध्ये पांढऱ्या मातीच्या मोठ्या उंचीच्या गढ्या निर्माण झाल्यात. करवंड, शेलसूर, धोत्रा भणगोजी या सारख्या अनेक गावांत गढ्या, राजवाडे, महालं, बारवं ,पुरातनकालीन महादेवांची मंदिरे, भुयारी मार्ग पहायला मिळतात. आता मात्र त्या पुरातन वास्तू नेस्तनाबूत होत चालल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावी  गढी परिसरात एकूण ५२ बुरुजे असल्यामुळे या गावाला बावन्न बुरजी असे नाव पडले होते. शिवकालीन युगात आजूबाजूच्या ५२ गावांचा कारभार करवंड येथून चालत असावा असे वाटते. या ५२ गावांतील महसूल या गावातील वतनदारांना मिळत होता....

रखुमा माझी पेरणी करी.

                रखुमा माझी पेरणी करी.....           पूर्वी एक म्हण होती की 'राजाने दुर्लक्षिले, पावसाने झोडपले आणि नवऱ्याने बायकोला मारले तर तक्रार कुणाकडे द्यायची ?' हा प्रश्न सर्व सामान्यांना पडत होता.कारण प्रत्येक जण स्वामीत्वाच्या भावनेने वागत होता.. शेतकरी बांधवांची हीच गत झाली होती . आजही तिच परिस्थिती आहे. दाद मागायची तर किती आणि कुणाला ? शेतात पेरताना जे हिरवं स्वप्न पाहिले होते, ते धो धो पावसामुळे मातीसोबत पार वाहून गेले. उरलं सुरलं पीक ज्या भागात कमी पाऊस होता, तेथे करपून गेलं आणि जिथे ढगफुटी झाली, तेथील पिकं अति पावसामुळे पार पाण्यात बुडून सडून गेले.        " बुडत्याला काडीचा आधार" या न्यायानुसार सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्याचे वचन दिले. तसेच पीक विमा कंपनी, जर शेतकऱ्यांनी बॅंकेकडून पीक कर्ज घेतले असेल तर परस्पर पीक विमा हप्ता कापून घेते, शेतकऱ्यांना थांगपत्ताही लागू देत नाही . आता पीक विमा द्यायची वेळ आली तर हात वर केले जाते. काहिना पिकविमा मिळाला तर काही प्रतिक्षेत आ...

विज्ञानोपासक, रविकुमार घुसळकर

    विज्ञानोपासक, रविकुमार घुसळकर - एक उत्तम विज्ञान शिक्षक   -----------------------------------------------------------------------      बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी बुद्रुक येथे रविकुमार देविदास घुसळकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1967 रोजी झाला.आई कुसुमबाई ही शिकलेली असून त्या नांदुरा येथील मालवणकर सोने-चांदी व्यापाऱ्यांच्या सुकन्या होत्या. वडील देविदासराव घुसळकर हे मुळचे हातेडी बु|| येथील.त्या काळी सातवा वर्ग पास असलेली माणसं शिक्षक म्हणून सहज नोकरीला लागत होते. तेव्हा सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळणे अवघड होते.आईवडील दोघेही आधी शिक्षक आणि पुढे मुख्याध्यापक होऊन सेवानिवृत्त झाले. त्यांची नोकरी त्याकाळी हातेडी बुद्रुक, केसापूर, आंभोडा, चांडोळ, सागवन याच परिसरात गेली. आईवडील नोकरीवर असल्यामुळे साहजिकच रविकुमार यांना शिक्षण घेण्याची आपसूकच संधी चालून आली.सरांनी प्राथमिक शिक्षण हातेडी बुद्रुक येथे आणि सातवीपर्यंतचे शिक्षण केसापूर येथे ५ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन पूर्ण करावे लागले.         पुन्हा श्री शिवाजी हायस्कूल ...

शूर लढवय्या सरदार : शिवाजीराव इंगळे

 शूर लढवय्या सरदार : शिवाजीराव इंगळे       शहाजीराजे भोसले यांच्या दरबारात आणि पुढे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात करवंडच्या इंगळे घराण्याचा सहभाग होता असे इतिहासातून लक्षात येते. तेथे लढवय्येवृतीचे अनेक सरदार होते, ज्यांनी रणांगण गाजवून शाबासकी मिळवली होती. शिवाजीराव इंगळे,बहीरजी नाईक इंगळे,कात्याजी इंगळे अशी नावे आपल्याला सांगता येईल.या सर्वांचा शिवरायांच्या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटीत प्रतापगडाच्या रणांगणावर, इंगळे सरदारांनी खूप जोखमीचे काम केले होते. त्यापैकी एक होते इंगळे घराण्यातील सुभेदार शिवाजीराव इंगळे. ते मराठा साम्राज्यातील एक शूरवीर सरदार होते. त्यांचा आदिलशाही दरबारात रूबाब होता. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेत मनापासून सहभाग होता. त्यांना गुणवंता नावाची एक कन्या होती. जी छत्रपती शिवाजी महाराजांची सातवी धर्मपत्नी होती. जिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी १५ एप्रील १६५७ रोजी झाला होता. सरदार शिवाजीराव इंगळे हे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत राहून त्यांनी स्वराज्यासाठी तलवार गाजवली ...