Posts

कृतिशील समाजसेवक -पंढरीनाथ पाटील

            कृतिशील समाजसेवक - शिक्षणमहर्षी पंढरीनाथ पाटील        ----------------------------------------------------------------------            विदर्भात अनेक रत्ने जन्माला जन्म आलीत. दलितमित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील हे त्यापैकी एक होत. पंढरीनाथ पाटील यांचा जन्म २० सप्टेंबर १९०३ रोजी खामगाव तालुक्यातील अंबोडा या लहानशा खेड्यात झाला. सिताराम पाटील आणि आई राधाबाई या वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीत पंढरीनाथ पाटलांचे बालपण गेले. विसाव्या शतकात सर्वप्रथम समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवणारे ते एक कुटुंब होते. पंढरीनाथ पाटील यांचे आजोबा गंभीरजी पाटील हे खर्चिक आणि उदार स्वभावाचे आणि कट्टर पुरोगामी विचारसरणीचे होते. ग्रामीण लोकं अनिष्ट रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यात जखडून गेली होती.        ब्रिटिश राजवटीत अज्ञान, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, कर्मकांड ,उच्चवर्णीयांची मक्तेदारी् यांचे विरुद्ध संघर्ष करणे सापे नव्हते. विसाव्या शतकात सामाजिक बंड करून समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्...

गोदावरीबाई - एक बाणेदार व्यक्तिमत्त्व

 गोदावरीबाई भुतेकर-पाटील : एक बाणेदार करारी व्यक्तिमत्त्व         बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बुll या गावी एका गर्भश्रीमंत कुटुंबात २४ मे १९३९ रोजी गोदावरीबाईचा जन्म झाला. रुस्तुमराव चंद्रभान पाटील पऱ्हाड आणि आई जनाबाई या वारकरी संप्रदाय विचारधारेच्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. सर्व भावंडात त्या मोठ्या होत्या. त्यांचा कुटुंबविस्तार फार मोठा होता. त्यांना ५ भाऊ व ४ बहिणी. त्यांच्या वडिलांजवळ त्या काळात ५०० एकर जमीन होती,असे ते सांगतात. परिसरातील पंचक्रोशीत त्यांच्यासारखे सधन कुटुंब नव्हते. काळ्या आईवर त्यांचे नितांत प्रेम होते. शेती म्हणजे एक सोन्याची खाण आहे अशी त्यांची धारणा होती. सांगायचे तात्पर्य म्हणजे त्या भागापुरते ते स्वातंत्र्यापूर्वी त्या गावचे एक मोठे वतनदार होते. ते परोपकारी आणि समाजशील होते. संध्याकाळी गावात ते फेरफटका मारायचे. ज्या घरातून धूर निघाला नाही , त्या घरात ते जायचे. चूल का पेटली नाही, हे आस्थेने विचारपूस करायचे.त्यांना कळायचे की हे घर आज उपाशी आहे. त्या कुटुंबाला ते पायली दोन ज्वारी बाजरी आणि काही...

संघर्षशील व्यक्तिमत्त्व : तुळशीराम जगदेव तायडे

    संघर्षमय जीवनातून वाटचाल करणारे : तुळशीराम जगदेव तायडे --------------------------------------------------------------------------          तुळशीराम जगदेव तायडे आजरोजी बुलडाणा येथे राहत असून ते सध्या शह्यांशी वर्षाचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे आईवडील जगदेव आणि आई आपाबाई हे निरक्षर असून कोऱ्हाळा बाजार येथे राहत होते. तुळशीराम जगदेव तायडे यांचा जन्म १९३९ साली झाला असावा असे ते सांगतात.जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी सात -आठ वर्षाचा होतो असे त्यांनी सांगितले. आईवडील काय करत होते, कसे देवाघरी गेले, हे त्यांना काहीही माहिती नाही.सांगता देखील येत नाही. साहाजिकच आई वडिलांचा सहवास त्यांना मिळाला नाही. मोलमजुरी हेच त्यांचे पोट भरण्याचे साधन होते. शिकण्याची इच्छा जरी झाली तरी शिकायला जायचं कोठे हा प्रश्न होता. त्याकाळी शिकण्याची सोय नव्हती.           शेवटी अनाथ, निराधार म्हणून हातेडी येथील त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला होता. मामा रावुबा जाधव यांचेकडे हातेडी येथे जवळपास पंधरावीस एकर जमीन होती. शिवाय बै...

संजय गोविंदराव टाके : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

       संजय गोविंदराव टाके : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व             बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील संभाजी नगर प्रभागात संजय गोविंदराव टाके यांचा जन्म २५ जानेवारी १९६८ रोजी एका गर्भश्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदराव रंगनाथ टाके आणि आई निर्मला गोविंदराव टाके हे त्याकाळी देशमुख घराण्याला शोभेल असे एक साजेसे वैभवसंपन्न कुटुंब होते. त्यांचे वडील शिकलेले असल्यामुळे त्यांना महसूल खात्यात नायब तहसीलदार पदाची चिखली येथे नोकरी मिळाली होती. दुर्दैवाने १९ जून १९८५ रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबावर अवकळा पसरली. त्यावेळी संजय टाके बिकाॅम च्या पहिल्या वर्षात शिकत होते.          परिवारात संजय टाके हे मोठे असल्याने खचून गेले. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. ते हतबल न होता नव्या जोमाने कामाला लागले. पदवीधर होऊन मोठं व्हावं आणि कुटुंबालाही मोठं करावं या हेतूने प्रेरित होऊन ते अभ्यासाला लागले. परंतु योगायोग सांगून येत नाही....

सैनिक दलात काम करणारे खेचर : पेडोंगी

          * सैनिक दलात काम करणारे खेचर : पेडोंगी *         भारतीय सैन्यासाठी अविरत कष्ट उपसणाऱ्या, आपल्या जीवाची पर्वा न करता स्वामिनिष्ठेने शत्रूराष्ट्राच्या गोळ्यांच्या वर्षावातही आपल्या पोस्टवर रिपोर्टिंग करणाऱ्या एका स्त्रीलिंगी खेचराची ही एक गोष्ट. ही माहिती मी गुगल वरून आणि योगेश शुक्ल यांच्या साहित्यातून संकलित केली आहे. पेडोंगीच्या पराक्रमाची "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये" नोंद झाली आहे . बऱ्याच लोकांना माहित नाही की, सरहद्दीवर भारतीय सेनेचा एक मजबुत कणा असलेला खेचर सैन्यासाठी माल वाहतूकीचे काम करते. पेडोंगी हे एक स्त्रीलिंगी खेचर आहे. सीमेवर, जिथे वाहतुकीची साधने नसतात, रस्ता नसतो, रेल्वेलाईन नसते, तेथे सैन्याला दारुगोळा आणि इतर उपजिवेकेची साधने, इंधन आणि रसद पुरविण्याचे काम खेचरं करतात.                           पेडोंगी नावाचे एक खेचर साधेसुधे नव्हते. तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलं आहे. जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती तेव्हा भारतीय सेनेत जवळपा...

दिपक चिंचोले - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

 कनिष्ठ अभियंता दिपक चिंचोले - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व  ----------------------------------------------------------------------------         बुलढाणा जिल्ह्यातील मोहाडी जवळ असलेल्या हिवरखेड गावी दिपक दगडूजी चिंचोले यांचा एका सामान्य कुटुंबात 23 ऑगस्ट 1967 रोजी जन्म झाला. त्यांचे मूळचे गाव चिखली जवळ असलेले मालगणी असून ते सध्या बुलडाणा येथे स्थायिक झाले आहे. त्यांचे वडील दगडूजी शामराव चिंचोले हे केवळ सातवा वर्ग असताना ते पोलीस विभागात नोकरीला होते. त्यांनी केलेल्या प्रामाणिक नोकरीचा मोबदला म्हणून त्यांना पदोन्नती मिळत गेली. शेवटी ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.        त्यांची आई इंद्रावती ही एक सामान्य कुटुंबातील चवथा वर्ग शिकलेली एक आदर्श गृहिणी होती. तिने फार मोठा प्रपंच सांभाळून सर्वांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी कष्ट केले. पोलिसांची नोकरी म्हणजे एक तारेवरची कसरत असते . केव्हाही कधीही रात्री बे रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला की हातातला घास बाजूला ठेवून ड्युटीवर जावे लागत असे.      त्यांना सहा ...
                       रा.दे. ऊर्फ ॲड.भोंडे सरकार : एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व        विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडणाऱ्या म्हसला बुद्रुक या गावी रामसिंग देवसिंग भोंडे यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९१८ रोजी झाला. रामसिंग देवसिंग भोंडे हे त्या गावी, पंचक्रोशीत, नव्हे एकूणच बुलडाणा जिल्ह्यात " भोंडे सरकार " म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.भोंडे सरकार या पंचक्रोशीतील एक फार मोठी आसामी होती. तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता. मोगलाईचे साम्राज्य होते. त्याची झळ मराठवाड्याला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांना पोहचत होती. त्या काळी शिक्षण घेण्याची सोय नव्हती.गरीबांना शिक्षण घेणे तर फार कठीण होते.         रझाकारांचा फार मोठा प्रभाव या भागात होता. तेथे मोगलाईचे साम्राज्य होते. भोंडे सरकारांची शिकण्याची जिद्द, हुशारी, चिकाटी आणि बाहेर गावी जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकता लक्षात घेता त्यांच्या वडिलांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण साखळी बुद्रुक आणि शिरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण बुलडाणा येथे पूर्ण केले...